HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ साखर कारखान्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणी सोमय्यांचे गंभीर आरोप

बीड | भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी गैरव्यहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या हे आज (१६ डिसेंबर) बीड दौऱ्यावर होते. यावेळी सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना मुंडेंवर ओरोपाच्या फैऱ्या झाल्या आहेत.

किरीट सोमय्या म्हणाले, “संत जगमित्र शुगर या साखर कारखान्यासाठी धनंजय मुंडेंनी फसवणूक केली असून त्यांनी मृत व्यक्तीचा अंगठा मारून जमीन बळकावली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी जून २०१९ मध्ये बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. राजाभाऊ फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुंडेंच्यासह इतर १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मी आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. पण मुंडेंचे सरकार असून ज्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. तो पोलीस ठाणा मुंडेंच्या हद्दीत येत आहे. मग हे सरकार या प्रकरणाची काय चौकशी करणार, असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणासंदर्भात सोमय्या हे अंबाजोगाईसह पुस व बर्दापूरला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान मी बीड दौऱ्यावर येण्याआधीमला धमकी मसेज आले. यासंदर्भात सोमय्यांनी ट्वीट करत एक नंबर शेअर केला आहे. मी बीडच्या एसपींना कळविले आहे. ‘पिलू हे बीड आहे, येथे….मध्ये चटणी भरली जाते, तु ये अन॒ माघारी जा’, ‘तुझ्यासारखा मुर्ख, नादान अन॒…कुणीच पाहीला नाही’ अशा मजकूराची ही धमकीचा स्क्रिीन शॉट किरीट सोमय्यांचा यांनी ट्विट केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांनी केली दुधाने अंघोळ

News Desk

शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द….

Arati More

आमिर खान मतदान केलाच नाही

News Desk