HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक!

नवी दिल्ली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या. याअगोदर हिंगोलीत मी राजीवच्या साथीने काम करायचे पण आज मी एकटी पडलीय, अशावेळी राजीवला मिस करतीय, असं म्हणत त्यांनी राजीव यांच्या आठवणी जागवल्या.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

मी चांगलं काम करुन दाखवेन

प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रज्ञा सातव म्हणाल्या, “याअगोदर हिंगोली जिल्ह्यात राजीवजींच्या खांद्याला खांदा काम केलंय. निवडणूक काळात आणि राजीवजी दिल्लीत असताना मी मतदारसंघात फिरायचे, लोकांना भेटायचे. पण त्यावेळी राजीवजींचं मार्गदर्शन असायचं. पण सध्या जबाबदारी मोठी मिळालेली आहे. अशावेळी राजीवजींची उणीव नक्की भासेल”, असं त्या म्हणाल्या.

उत्तम काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन

“काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी कठीण काळात माझ्या पाठीशी होते. आजही निवडीनंतर अनेकांचे फोन आले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं सातत्याने मार्गदर्शन असतं. राज्यातील नेतेमंडळीही पाठीशी उभे आहेत. आता मिळालेल्या जबाबदारीनंतर आव्हान जरी मोठं असलं तरी कामाला संधी असल्याने उत्तम काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन”, असं त्या म्हणाल्या.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्याचं शिस्तपालन कमिटीची धुरा सोपवण्यात आली आहे. यूपीएच्या काळात केंद्रात महत्वाची भूमिका बजावलेल्या आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राज्यातील सत्तेत कुठलंही महत्वाचं पद नाही. दरम्यान, अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धार्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुण्यात निधन

News Desk

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna

भ्रष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीसांनी जोड्यांनी मारले पाहिजे!

Aprna