HW News Marathi
महाराष्ट्र

“बुद्धीला जे वाटले ते ते बोलले!”- अजित पवार

मुंबई। “बुद्धीला जे वाटले ते ते बोलले, ” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण यांना लगावला. आमचे सरकार चालणार असल्याचे आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले, असे देखील पवार म्हणाले. ज्या दिवसापासून महाविकासआघाडीचे सरकार आले. तेव्हापासून सरकार पडणार असल्याचे ऐकत आहे. पण सरकार चालेलना ना बाबा, असे पवार म्हणाले.
“मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही,” अशी भविष्यवाणी राणेंनी केली आहे. राणेंच्या भविष्यवाणीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

राणे नेमके काय म्हणाले

मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. माझ्या मनात काही गोष्टी तर आहे. पण मी त्या आताच सांगणार नाही. राज्यात नवे सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार आणण्याचे असेल. तर काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात, असा इशारा देखील राणेंनी दिला आहे. राणे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हे आजारी असल्यामुळे आजारी माणसाचे नाव घेऊन काही बोलणे योग्य वाटणार नाही. परंतु महाविकाआघाडी सरकारचे लाईफ अधिक नाही, असे सूचक विधान राणेंनी केले आहे. राणेंच्या भविष्यवाणीवरून राजकीय वर्तुळा चर्चा सुरू झाल्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये

तसेच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा बऱ्यांपैकी पगार वाढलेत, तरी टोकाची भूमिका का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पवारांनी वेतन वाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीनंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. मग सर्वजण उद्या विलीनीकरणाची मागणी करतील. एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये, असा सल्ला ही पवारांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

News Desk

हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे, अजित पवारांचा भाजपला टोला

News Desk

औरंगाबादमध्ये शहाच्या पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेनी तळली भजी

News Desk