HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई लोकलबद्दल मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदाच दिलासादायक बातमी!

मुंबई | मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध जरी शिथिल केले आहेत तरी लोकलसाठी मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. हायकोर्टने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे लोकल प्रवास सुरु करण्यासाठी मागणी केली आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदा पॉसिटीव्ह प्रतिक्रिया आली आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र

महाराष्ट्रत जरी निर्बंध शिथिल केले असले तरी देखील परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे दिलासादायक विधान केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कृपया संयम सोडू नका

जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामचुकार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा थेट सरप्राईज कॉल

News Desk

पवार कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित !

News Desk