HW News Marathi
देश / विदेश

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं शनिवारी निधन झालं. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालतं का ? अशी विचारणा केली आहे.

झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का?

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.

भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपाने ट्वीट केलेल्या फोटोत कल्याण सिंह यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेला दिसत आहे. यावेळी तिरंग्यावर अर्ध्या भागात भाजपाचा झेंडाही दिसत आहे. यामुले विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लखनऊमध्ये पोहोतून कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना ४ जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते जवळजवळ बेशुद्धावस्थेत होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आलं होतं. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

Aprna

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७५वी जयंती, दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

News Desk