HW News Marathi
महाराष्ट्र

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

मुंबई | मुंबईत जरी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरीही सणांवर अजूनही बंदीच आहे. दहीहंडी, गणेशोत्सवासाठी या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत एक बैठक आयोजित केली आहे.

दंडीहंडी साजरी करण्यास परवानगी

यंदा ३१ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव आहे. त्यामुळं मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव निर्बंधांत साजरा होणार का? की राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार का हे आज स्पष्ट होणार आहे. छोट्या प्रमाणात का होईना दंडीहंडी साजरी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांनी केली आहे. यावर आज बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

खबरदारी घेऊ, पण दहीहंडी साजरी करु

कोरोनाच्या संकटामुळे अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली आहे. दसरा, दिवाळीसारखे मोठे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशावेळी मनसेनं मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलं आहे.

३१ ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा, असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द

दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव-पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री

News Desk

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

News Desk

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

swarit