HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

मुंबई। राज्यात आज दिवसभरात ८ हजार १९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर ५ हजार १३२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. असे जरी असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसा दिलासा वाटत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

एकूण रुग्णसंख्या

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५४१३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५८,०६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“साधूंवर विश्वास ठेऊ नका साधू नालायक असतात”, विजय वडेट्टीवारांचे गंभीर वक्तव्य  

News Desk

फडणवीस सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात कायदा टिकवला – आशिष शेलार

News Desk

राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

News Desk