HW News Marathi
महाराष्ट्र

NCB वर बोलतोय तेव्हापासून धमकीचे फोन; नवाब मलिकांना वाय प्लस सुरक्षा

मुंबई। क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचं सांगत अनेक मोठे गौप्यस्फोट करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुरुक्षा आता वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीवर जेव्हापासून बोलतोय, तेव्हापासून मला धमकीचे फोन येत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

जेव्हापासून पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून देशभरातून कार्यालयात फोन येत आहेत

सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. कशासाठी सुरक्षा वाढवली याची माहिती नाही. पण सुरक्षा वाढवील हे खरं आहे. तसंच हे देखील खरं आहे की, जेव्हापासून पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून देशभरातून कार्यालयात फोन येत आहेत, उडवून टाकू, इथे मारु, तिथे मारु…अशा धमक्या येत आहेत. हे कोण लोक आहेत याची लेखी तक्रार आम्ही गृह विभागाच्या सचिवांना देणार आहोत. जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. चार बंदुकधारी जवान, पायलट कार अशा पद्धतीची सुरक्षा असणार आहे. तसंच, मलिक यांच्या घरीही चार जवान तैनात असणार असल्याची माहिती मिळते. याआधी नवाब मलिकांच्या सुरक्षेत केवळ एक जवान होता.

एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूमधला फरक कळतो की नाही

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले होती. मलिक यांनी आरोप केला आहे की, जावई समीर खानला बनावट प्रकरणात अटक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्या नंबरवरुन सर्व माध्यमांना समीर खानकडे २०० किलो गांजा सापडल्याचे सांगितले असल्याचे नवाब मलिकांनी आरोप केला आहे. तसेच समीर खानकडे हर्बल तांबाखू होता त्याला गांजा दाखवण्यात आले आहे. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूमधला फरक कळतो की नाही असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, जीवितहानी नाही

News Desk

हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलूनच दाखवा! – इम्तियाज जलील

News Desk