HW News Marathi
महाराष्ट्र

“कोव्हिड काळात मुख्यमंत्र्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन!”, एकनाथ शिंदेंचं सीटी रवींना प्रत्युत्तर

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड काळात योग्य पद्धतीने नियोजन केले, असे म्हणत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे पुढे म्हणाले, “राज्यातील कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नियोजनाचे सर्वोच्च न्यायालयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले होते, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणालं.
दरम्यान, राज्यात कोव्हिडची दुसरी लाट, दुसरीकडे अतिवृष्टी, तिसरीकडे निसर्ग चक्री वादळ ही संकटं आली. या परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना मदती दिला. यावेळी सरकारनं दोन्ही वेळी १०-१० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देऊन शेतकऱ्यांन मदत केली. या सर्वात परिस्थितीत देखील विकास कामांना कुठेही विराम दिला नाही. त्यामुळे सरकार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम केल्याचं हे चित्र स्पष्ट आहे,” असे शिंदेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर पुण्यात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणालं.

उद्धव ठाकरे हे पार्टटाइम मुख्यमंत्री । सी. टी. रवी

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पार्टटाइम मुख्यमंत्री आहेत. फुलटाइम नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहिती झाले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्यांची गरज आहे,” अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड महापालिकेत काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल 

News Desk

मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही – एकनाथ खडसे

News Desk

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

News Desk