HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशात सपा-राष्ट्रवादी एकत्र ,या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, राऊतांचा सवाल

नवी दिल्ली | राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीने काल(२८ जुलै) एकत्र येऊन भाजपला निवडणुकीत पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीला मात्र शिवसेनेचा पाठिंबा नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, असा सवालच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल

राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीच्या युतीमुळे राजिक्य चळवळींना उधाण आलं आहे. शिवसेना निवडणुका लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा आहेत. त्यांनी विजय प्राप्त करावा, याही शुभेच्छा आहेत. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय. सपाशी अजिबात युती होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी

भाजपला सत्तेत पाडण्यासाठी आता राजिक्य हालचालींना ऊत आला आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखं उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपाला रोखू,” असे केके शर्मा यांनी म्हटले आहे.

भाजप सरकार लोकशाही साठी घातक

भाजप हे लोकशाही घातक आहे अशी प्रतिक्रिया के. के शर्मांनी दिली आहे. शर्मा म्हणाले की, “पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रवादीला उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल कारण तेथील भाजपा सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि आवाज दडपला जात आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

मोदी सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ !

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk