HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा तर फडणवीसही जाणार पश्चिम महाराष्ट्रात!

मुंबई | राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या पुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली होती. दरम्यान, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे उद्या (२९ जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्याच कोल्हापूर दौरा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चा रंगली आहे.

नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री ज्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात जाऊ शकले नव्हते, त्या गावात देवेंद्र फडणवीस जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील मोरगिरी/आंबेघर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेणार. त्यानंतर सायं. 5.15 : हुंबरळी ता. पाटण येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

शेतीचं सुमारे ६६ कोटींचं नुकसान

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं सुमारे ६६ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे ५८ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसारल्याने ठिक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. भराव वाहून गेल्याने पुढील काही दिवस मिरज-कोल्हापूर रेल्वेसेवा बंद राहणार आहे. एक किलोमीटरवरील भराव वाहून गेला आहे. पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

News Desk

“पुन्हा कामावर जाण्यातच तुमचं आणि कुटुंबाचं हित”; ST कर्मचाऱ्यांना राऊतांचा सल्ला

News Desk

“महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी”- आदित्य ठाकरे

News Desk