HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेजची घोषणा

उस्मानाबाद | मराठवाङ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असुन उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासन लवकरात लवकर पंचनामे करत असुन लवकरच पिक विमा व शासकीय भरीव मदत करेल , शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं अमित देशमुख यांनी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पाहणीवेळी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उपस्थित होते.

येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेजची घोषणा

महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होईल व त्यात काय स्वरूपात व कशी मदत करायची याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेजची घोषणा होऊ शकते, असं अमित देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

आकडेवारी जमा करणे सुरू आहे, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे व त्याला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन तत्पर आहे, असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. विमा धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. शेतकऱ्यांना विमा कंपन्या दाद देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विमा कंपन्या दाद देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असंही मंत्री देशमुख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी तटकरेंची नियुक्ती

News Desk

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भाजप-शिवसेना पक्षांचे गोड कौतुक

News Desk

३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी !

swarit