HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि शरद पवारांच्या उपस्थित’ मुंबईकरांचे स्वप्न होणार पूर्ण!

 

मुंबई। आतापर्यंत अनेक सरकार सत्तेत आले आणि गेले मात्र या सरकारांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच स्वप्न दाखवलं. अखेर ते सत्यात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. अखेर बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी

आता मोठी घोषणा केली आहे.

भूमिपूजनाची इतिहासात नोंद होईल

आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 27 जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ होणार असून हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते व शरद पवार यांच्या उपस्थित पार पाडणार आहे. त्यापुढे त्यांनी या भूमिपूजनाची इतिहासात नोंद होईल असाही उल्लेख केला आहे.

कुणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवले जाणार नाही

बीडीडी चाळ पुनर्विकासात निवासस्थान हे दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी पोलीस दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निवासस्थानांपैकी काही निवासस्थाने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडेही आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीत दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवले जाणार नाही. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणेश विसर्जनासाठी फक्त 5 ते 10 जणांना परवानगी!

News Desk

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

News Desk

“बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग”, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान!

News Desk