HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 120 जणांचा कोरोनाने घेतला बळी!

मुंबई। राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत ( चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राज्यात आज (22 जुलै) कोरोना बाधितांपेक्षा काही प्रमाणात कोरोनातून मुक्त झाल्याची संख्या जास्त आहे. तसेच राज्याच्या पॉझिटीव्हीटी दरात किंचीतशी वाढ झाली आहे. तर मृत्यू दरात ही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झालीये.

महाराष्ट्रात आज दिवसभरात एकूण 7 हजार 302 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 7 हजार 756 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 16 हजार 506 जण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.34% इतकं झालंय.

मृत्यू दर

कोरोना रुग्णसंख्येप्रमाणे मृतांच्या संख्येतही चढ-उतार आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामुळे राज्याचा मृत्यू दर हा आता 2.09% इतका झालाय.

ॲक्टीव्ह रुग्ण 1 लाखांपेक्षा कमी

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांचा हा आकडा आता लाखांच्या आत आला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकूण 94 हजार 168 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

News Desk

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मला कोअर कमिटीतून बाहेर काढले !

News Desk