HW News Marathi
Covid-19

उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर दुकाने सुरु करणारच ! कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर | कोरोनाच्या काळात, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे उद्योग क्षेत्राला त्याचा फटका बसला. कित्येक व्यापार बंद पडले आणि कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. देशात कोरोना थैमान घालत असल्याने निर्बंध लागू आहेत. अजूनही व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेलेली नाही. कोल्हापुरात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने ‘माझा व्यापार, माझी जबाबदारी’ हे नवीन धोरण स्वीकारलं आहे. कोल्हापूर महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्ष ललित गांधी यांनी व्यापाऱ्यांची परीक्षा न पाहता काय तो निर्णय द्यावा अशी मागणी आज (३ जुलै) केली आहे.

व्यापारी आपल्या कुटुंबियांसोबत होणार सामील

सलग ३ महिन्यनाचा लॉकडाऊनमुळे, वेगवेगळ्या खर्चांमुळे व्यापारी मेटाकुटीला आला आहे. सरकार कडे मागणी करूनही काहीच होत नसल्याने व्यापारी वर्ग आता संतापला आहे. रविवारपर्यंत कोणताही निर्णय आला नाही तर सोमवारपासून दुकाने सुरु करण्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांच्या बरोबर बसून निर्णय घ्यावा यासाठी कोपरा सभा आयोजित केली असून या कोपरा सभेत व्यापारी आपल्या कुटुंबियांसोबत सामील होणार आहेत.

अशी आहे कोल्हापूरमधील नियमावली

– नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

– अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इत्यादी दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.

– हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.

– शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे सुरू ठेवावीत.

– अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद

– मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

– रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

– खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले !

News Desk

कोकणातील चाकरमानी २ दिवसांत जाणार आपापल्या गावी

News Desk

लंडनहून १० जण रत्नागिरीत, कोकणाची चिंता वाढली!

News Desk