HW News Marathi
महाराष्ट्र

जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्री करा- छत्रपती संभाजीराजे

बीड | राज्यात मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ताण निर्माण झाला आहे. यावर काल बीडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे यांनी मला मुख्यमंत्री करा सगळे प्रश्न सोडवतो असं म्हटलं आहे. पुढे ते असं म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना विचारा. मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा आणि जर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा, असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना केले आहे.

संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट राजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, अशी मागणी का तुम्ही करत नाहीत. त्यावेळी संभाजीराजे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना, मी ही मागणी करू शकत नाही, आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा, तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच मागच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विचारा. तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यामुळं छत्रपतीची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट झाली का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.

तर बीडमध्ये संवाद यात्रेच्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडे सारथी संदर्भात व इतर काही मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत.त्या पूर्ण करू, असा शब्द राज्य सरकारने दिला आहे. मात्र, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. तर छत्रपतींची भूमिका बदलेल. हात वर येतील, बोट समोर येतील, कॉलर वर येईल, बटणे उघडतील, एवढेच नाही तर कपडे देखील डार्क होतील.असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची !

News Desk

‘मी आता संजय राऊतांवर पुस्तकचं लिहिणार!’ चंद्रकांत पाटलांकडुन खिल्ली

Arati More

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Aprna