HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांना राजकारणातून संन्यास घेऊ देणार नाही,राज्याला त्यांची गरज!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”

#sanjayraut #devendrafadnavis #bjp #mahavikasagahdi #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

Arati More

Nirbhaya हत्याकांडाची Maharashtra मध्ये पुनरावृत्ती! अखेर मृत्यूशी झुंज हरली…

News Desk

उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सावधगिरीचा सल्ला

News Desk