HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ, फडणवीसांचं महत्वाचं विधान

मुंबई। ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा भूमिका या राज्य सरकारकडून केल्या जातात, कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा डावपेच आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तुम्ही जोडे मारा, हार घाला, पण…

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होतय अस देखील देवेंद्र फडणविस म्हणालेत. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय,

अजित पवारांना खोचक टोला

तर दुसरीकडे अजित पवारांच्या पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जमलेल्या गर्दीचा खोचक टोला देखील लगावला,

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं फडणवीसांनी सांगितलं.

फक्त दोन दिवसांच अधिवेशन असताना राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का? असे एक ना अनेक सवाल फडणवीसांनी उपस्थित केलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला दुष्काळ घोषित करुन पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?, आशिष शेलारांचा आरोप

News Desk

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

News Desk