HW News Marathi
महाराष्ट्र

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, फेरिवाला केवळ एक कारण, कल्पिता पिंपळेंचा खळबळजनक दावा

ठाणे। महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता. ठाण्यातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु असताना कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याचं एक बोट तुटलं आहे. पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कल्पिता पिंपळे यांनी सांगितली हकीकत

या हल्ल्यात माझी दोन बोटं माझी गेली. पण केवळ फेरिवाल्यांवर कारवाई होती म्हणून दोन बोटं गेली, असा प्रकारचा एक समज निर्माण झालेला आहे. याबाबत मला थोडसं सांगायचं आहे की, आमच्या ज्या बदल्या झाल्या आणि आम्ही जी अनधिकृत बांधकामं तोडायला सुरुवात केली. मी आल्यानंतर बाळकुम, कासारवडवली या भागात सात मजली, पाच मजली इमारती तोडायला सुरुवात केली. त्यानंतर अनधिकृत ढाब्यांवर कारवाई केली. त्यानंतर मी फेरिवाल्यांना हात घातला हे सर्वांना माहिती आहे. फेरिवाल्यांना जर निषेध नोंदवायचा असता तर जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असती. माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला असता. सगळी कारवाई झाली. त्यानंतर मी जेव्हा तिथे गेले, माझ्या गाडीतून उतरले त्यानंतर 4-5 मिनिटांनी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्यामागे मला फेरिवाला वाटत नाही. आम्ही जी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत, ती कारवाई कुठेतरी थांबावी असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे हा हल्ला झाला असं मला वाटतं”, असा संशय कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचं आश्वासन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 सप्टेंबर रोजी कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. “जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तु्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्री पिंपळे यांना म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता अजित पवारांचा राजीनामा मागणार का?”, आशिष शेलारांचा सवाल

News Desk

चक्रीवादळामुळे झालेली नुकसाभरपाई द्यावी – फडणवीस

News Desk

‘अमृता फडणवीस कोण आहेत ?’, किशोरी पेडणेकरांचा टोला

News Desk