HW News Marathi
Covid-19

राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

मुंबई | सध्या राज्याच्या रुग्णवाढीचा दर हा 0.07 टक्के एवढा आहे. पण, राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा अधिक सर्वाधिक आहे. राज्यातील अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या सरासरीच्या तुलनेत अधिक रुग्णवाढीचा दर आहे. तसंच, अहमदनगर आणि सातारा हे दोन्ही जिल्हे सध्या काळजी करण्याचे जिल्हे असल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा देशाच्या तुलनेत कमी असला तरी असे 6 जिल्हे आहेत, जिथे अजूनही रुग्णवाढ मोठ्या संख्येने होत आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त करत याच जिल्ह्यांतून तिसऱ्या लाटेची किंवा दुसऱ्या लाटेत कमी झालेली संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.अहमदनगर मध्ये सर्वाधिक 0.25 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. त्याखालोखाल साताऱ्यात 0.19 टक्के, सोलापूरमध्ये 0.19 टक्के, सांगलीत 0.15 टक्के, रत्नागिरीत 0.13 टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये 0.09 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. दरम्यान, बाकी इतर जिल्ह्यांध्ये रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा कमी असून 0.06 एवढा किंवा त्यापेक्षा ही खाली आहे.

पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर

पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. सध्या पुण्यात 6.58 टक्के पॉझिटिव्हीटी दर आहे. त्याखाली अहमदनगरमध्ये 5.08 टक्के पॉझिटिव्हीटी दर आहे. दहा दिवसांपूर्वी एकही असा जिल्हा नव्हता जिथे पॉझिटिव्हीटी दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. पण, आता हे दोन जिल्हे आहेत जिथे हा दर दिवसेंदिवस वाढत आहे. तर, एकूण आठ जिल्हे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी दर जास्त असून इथे अधिकची काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात भारतात ४५ हजार ८९२ नवे रुग्ण तर ८१७ रुग्णांनाचा मृत्यू

Jui Jadhav

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! HW चे सल्लागार संपादक विनोद दुआंविरुद्धची देशद्रोहाची तक्रार रद्द

News Desk

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

News Desk