HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारने माफी मागून दंडाचे पैसे लोकांना परत करावेत !

मुंबई । “राज्यातील ठाकरे सरकारने २ किलोमीटरचा नियम सांगून मुंबई पोलीसांनी ४० हजारांहून अधिक गाड्या जप्त करून मोठा दंड आकारला. लोकांच्या खिशात आधीच पैसे नसताना महाविकासआघाडी सरकारची ही कोणती दादागिरी?”, असा सवाल आता भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या या ‘२किमीच्या’ निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याने आता हे निर्णयच रद्द करण्यात आला आहे. फक्त नागरिकांनी आपल्या नजीकच्या परिसरात वस्तूंची खरेदी करावी, अशा सूचना आता मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. यावरून देखील भाजपने टीका केली आहे.

“२ किलोमीटर असा शब्द काढून नवीन नेबरहूड हा शब्द आला परंतु मुंबईकरांना झालेल्या त्रासाचे त्यांच्या दंडासाठी भरलेल्या पैशांचे का ? महाविकासआघाडी सरकारच्या लहरी स्वभावामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झाला आहे”, अशी टीका राम कदम यांनी सरकारवर केली आहे. त्याचप्रमाणे, “सरकारने जनतेची माफी मागत वसूल केलेल्या दंडाचे पैसे परत करावेत”, अशी मागणी देखील यावेळी राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. दरम्यान, ‘अनलॉक २’करिता मुंबई पोलिसांकडून घेण्यात आलेल्या ‘२ किमीच्या’ निर्णयावर लोकांकडूनही मोठी नाराजी व्यक्त केली गेली. शरद पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावर आक्षेप घेतला. त्यामुळे हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल?, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

News Desk

चक्रीवादळापेक्षा कोरोनाच्या वादळाला थांबवा, संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

News Desk

‘जंबो हाॅस्पिटल आमच्या ताब्यात द्या‘ महाविकासआघाडी आणि भाजपवर रूपाली पाटील बरसल्या !

swarit