HW News Marathi
महाराष्ट्र

….जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही!

अकोला | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्या महाविकासआघाडी सरकारमधीलचं नेत्यांनीच समाचार घेतला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाना पटोले यांचा चांगलाच टोला लगावला आहे. उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. याला काही अर्थ नाही. हे राजकीय क्षेत्रात चालतच राहते याकडे लक्ष देऊन मनावर घेऊ नका, असे सांगत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले पटोले यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना मी विधानसभेत अनेक वर्ष पाहिले आहे. त्या लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रणरागिणी आहेत. वेळ आली तर त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाहीत,’ असे पटोले म्हटले होते. यावर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले नाना पटोले कोणत्या अर्थाने म्हटले ते शोधावे लागेल कारण मी ऐकले नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायची वेळच नाही. कारण हे आघाडीचे सरकार आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले होते?

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी आणि येत्या काळातील निवडणुका व मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केले होते. ते विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. तसेच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हणाले होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असेही त्यांनी बोलून दाखवले होते. नंतर पटोले यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते.

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे. त्यांना उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोणाला मुख्यमंत्री करायचे ते. दरम्यान, नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले म्हणाले पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साडेपंधरा हजार पदांची भरतीप्रक्रिया लवकरच… राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

News Desk

“मी तुम्हाला शब्द देतो…,” उद्धव ठाकरे त्या महिलेशी नेमकं काय बोले?

News Desk

पोलीस दलाचं खच्चीकरण, गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची मागणी  

News Desk