HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती सध्या दिलासादायक आहे. कारण, दैनंदिन वाढणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (१४ जून) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी कि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ०८ हजार १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच एका दिवसात २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच याच गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ४७ हजार ३५४ इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

News Desk

अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा

News Desk

बाळा नांदगावकरांनी ‘सुदामाचे राजधन’ भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk