HW News Marathi
देश / विदेश

दोन्ही राजे केंद्र सरकारच्या मिठाला जगल्यासारखं बोलले ! शिवसेनेचा बोचरा टोला

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे. याच मुद्द्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अखेर आज (१४ जून) खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. सविस्तर चर्चेनंतर अखेर उदयनराजे यांनी आपले संभाजीराजेंसोबत एकमत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या दोन्ही राजेंच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. अरविंद सावंत

याबाबत बोलताना म्हणतात कि, “मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले. स्वागतंच आहे. पण हे दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत”, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

राज्यातील एक ज्वलंत मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणासोबतच अरविंद सावंत यांनी यावेळी राज्याशी निगडित काही अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील भाष्य केले आहे. अरविंद सावंत यावेळी म्हणाले कि, राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांबाबत घटनेप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे. परंतु सध्या निव्वळ राजकारण सुरु आहे. घटनेची पायमल्ली होत आहे.” याचसोबत अरविंद सावंत यांनी यावेळी चर्चेत असलेल्या राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केले आहे. “राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. धर्माच्या भावनांशी खेळू नका”, असे अरविंद सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

‘ते’ वक्तव्य चुकीचे, आमचा निषेध ! चंद्रकांत पाटलांकडून घरचा आहेर

News Desk