HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना काळात राज्यापुढे आणखी एक संकट, रक्ताचा ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

मुंबई | देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचं हे संकट असतानाच आता राज्यासमोर आणखी एक संकट उभं राहिलं आहे. मुंबईसह राज्यात पुढील ५-६ दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठाशिल्लक असल्याची आता माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही देखील केलं आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. “मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढा तर जास्तीत जास्त दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत” असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चिट

News Desk

सेना- मनसे- भाजप – असा प्रवास करत सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये स्थिरावणार

News Desk