HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण ‘भाजप’ला पुरून उरेल!

मुंबई | ‘पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेलं महाभारत खऱ्या महाभारतापेक्षाही भयंकर आहे. ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी केंद्रातील सरकार हे महाभारत घडवत आहे. पण भाजपनं कितीही ताकद लावली तरी ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण त्यांना पुरून उरेल,’ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (१ एप्रिल) व्यक्त केला आहे.

“पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम….केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल”. संजय राऊत यांनी यावेळी ममता बॅनर्जी सहज विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, “या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरु केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीर मुद्यावरून मलालाने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांची सडकून टीका

News Desk

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk