HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती !

Lमुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे धक्कादायक आरोप केले.त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदिवाल यांच्या नेतृत्वाखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतीत 6 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटीचं टार्गेट सचिन वाझेंना दिल होतं असा आरोप परमवीर सिंग यांनी केला आहे.अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता,इतकंच नाही तर महाविकासआघाडी सरकार देखील अडचणीत आलं होतं. परमबीर सिंग यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हा खळबळजनक आरोप केला होता.

परमबीर सिंग यांनी पत्रात काय म्हटलं होतं ?

परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं होतं की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना बोलावून मुंबईत असलेल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून ४० ते ५० कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते. पाटील यांनी त्याच दिवशी मला याबाबत माहिती दिली.’

एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या गंभीर आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अनिल देशमुख यांनी खोडून काढले होते. त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदी, शहा यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील !

News Desk

लॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

News Desk