HW News Marathi
Covid-19

मुंबईकरांनो हे कधीही न पाहिलेले चक्रीवादळ, विनाकारण घराबाहेर पडू नका !

मुंबई । तौक्ते चक्रीवादळ राज्याला येऊन धडकले आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक भागांत पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून समुद्रालाही उधाण आले असून उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहे. मुंबईतील ही स्थिती काहीशी चिंताजनक असल्याने आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममधून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.

मुंबईतील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, “या चक्रीवादळाची दिशा गुजरातकडे असून वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. सखल भागात पाणी साचले आहे. आज रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील. वादळ आणि वाऱ्यासह 160 मिमी, 120 मिमी पाऊस होतो आहे. मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत. हायटाईड असली तरी निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल” असे सांगत पुढे “मुंबईकरांनो कधीही न पाहिलेले चक्रीवादळ मुंबई आता पाहत आहे. त्यामुळे, विनाकारण घराबाहेर पडू नका”, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देखील चर्चा झाल्याची माहितीही दिली आहे. “केंद्र आणि राज्यात चर्चा होऊन आवश्यक सूचना दिल्या जात आहे. आम्ही एकमेकांशी समन्वय साधून काम करत आहोत”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने साखर उद्योगाला चालना देशासाठी पवारांनी सुचवले ‘हे’ पर्याय

News Desk

देशात कोरोनाचा नको असलेला विक्रम! २४ तासांत ३ लाख ४६ हजारांच्यावर आढळले रुग्ण

News Desk

फक्त राजकारण आणि महाराष्ट्र द्रोह | जितेंद्र आव्हाड

News Desk