HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून काही जिल्ह्यांत सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन जनता कर्फ्यू, नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, हा महत्वाचा प्रश्न बनला असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१० मार्च) पुन्हा एकदा सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे, याकडे लक्ष वेधत कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार का, असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी लॉकडाऊन करण्याची सरकारची तरी इच्छा नसल्याचे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत व लॉकडाऊन टाळायला हवा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही वारसदार आणि तुम्हीच…”, पडळकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

News Desk

कोल्हापूर – सांगलीवर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे…!

swarit

कोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात!

News Desk