HW News Marathi
महाराष्ट्र

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात ,मास्क घालून मंत्र्यांचे कामकाज सुरू…

मुंबई | आजपासून (७ सप्टेंबर) विधी मंडळाच्या २ दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळात सोशल डिस्टंसिंग ठेवून आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आमदार, कर्मचारी यांना मास्क घालने अनिवार्य असणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होत आहे .

दरम्यान, अधिवेशनाच्या सुरूवातीलाचं अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. अजित पवार यांनी GST सुधारणा विधेयक मांडले आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाला हरकत घेतली आहे. तसेच, इतर नेत्यांनी देखील केलेल्या मागण्या मान्य करत अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी ७ दिवस करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

News Desk

सचिन वाझेंची क्राईम ब्राँचमधून बदली, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

News Desk

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत! – धनंजय मुंडे

Aprna