HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत खाऊन-पिऊन तरारलेल्या कलावंताने मराठी अस्मितेवर दारुच्या केलेल्या गुळण्या सहन करणार नाही! 

मुंबई | मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरीशी केल्याने अभिनेत्री कंगना राणावत विरोधात सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. शिवसेनेनेही कंगनाविरोधात आवाज उठवला आहे. तसेच मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे अवमान करण्याऱ्या कंगना विरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवायला हवा, असे आवाहनही शिवसेनेच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात चांगलेच वाद रंगल्यांचे पाहायला मिळत आहे. कंगनाने मुंबई पोलीस व मुंबई विरोधात केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे. आता शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून कंगनाविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे आवाज उठवण्याची मागणी केली आहे.

“विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही”.

“राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱ्या त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण, भाजपची जहरी टीका

News Desk

ठरलं! राज्यात ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार

News Desk

”कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई”, किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या!

News Desk