HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन होणार सुरू

मुंबई | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून (७ सप्टेंबर) सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा करतो”, राऊतांचा मोदींना टोला

News Desk

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्याबाबत राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल – मुंबई हायकोर्ट

News Desk

आयुक्तावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी रवी राणांवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल

Aprna