HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करू – चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अशात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने एकत्र काम करणे गरजेचे आहे.राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे कोरोनाच्या संकटाचा सामना करुया, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले.

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि उपाययोजना ठरवून कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे, असे चंद्रकांत पाटलांनी सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

News Desk

अमेरिकेहून मुलगी परतल्याची माहिती लपवली, तरीही लहान बाळांवर केले डॉक्टरांनी उपचार

swarit

चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड, सोमय्यांवर 150 कोटींचा मुश्रीफ दावा करणार!

News Desk