HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक! १ एप्रिलपासून वीजदर २ टक्क्यांनी कमी करण्याचे MERC चे आदेश

मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. १ एप्रिल २०२१ पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आले.

एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महावितरण – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्के तर नॉन रहिवाशीसाठी कंपनी, इंडस्ट्री यांना २-५ टक्के

बेस्ट – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.१ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना ०.३-२.७ टक्के

अदानी – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.३ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना १.४-१.६ टक्के

टाटा – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ४.३ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना १.१.-५.८ टक्के

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ प्रकरणानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला..

News Desk

परळीत धनंजय मुंडे गटाने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले

News Desk

भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग | शरद पवार

News Desk