HW News Marathi
महाराष्ट्र

“किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन करा”, छगन भूजबळ मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार!

मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी केली आहे. कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल (१९ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन दिवसांत मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती दिली आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यात कडक लॉकडाउनची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आज (२० एप्रिल) मंत्रीमंडळ बैठक होणार असून यावेळी लॉकडाउनसंबंधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत आपण १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. “आज ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची जितक्या प्रमाणात गरज आहे तितकी उपलब्धता नाही. आता विशाखापट्टणम वैगेरे येथून ऑक्सिजन आणावा लागत आहे. मला वाटतं जर १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन केला तर इतर सगळ्या गोष्टी, साधनसामुग्री एकत्र करण्यास वेळ मिळेल. तसंच करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपयोग होईल,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“साखळी तोडणं आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणं या दोन मार्गांनी काम केलं पाहिजे. लोक कारणं काढून फिरतातच आहेत. आठ ते दहा दिवसांनी लोकांना काही अडचण होणार नाही. सहा ते आठ महिन्यांचा लॉकडाउन नको. पण १५ दिवसांसाठी केलं तर बरं होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असून आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मुद्दा मांडणार आहे,” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे आजची बैठक ही महाराष्ट्रातील कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णायक आणि महत्वाची असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने ! अर्णबवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध …

News Desk

MPSC परीक्षा रद्द करुन सरकारने एकाच जातीचा विचार केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

News Desk

आता पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधाक कारवाई होणार !

News Desk