HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरे उघडावीत आम्ही २ तारखेला मशिदी उघडू , इम्तियाज जलील यांचे सरकारला अल्टिमेटम

मुंबई | राज्यात हळूहळू सर्व काही पूर्व पदावर येण्यास सुरुवात होत आहे. मात्र, अजूनही धार्मिक स्थळे सुरु न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच एमआयएमचे नेते इम्तीयाज जलील यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरे उघडावीत, आम्ही २ तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी दिले आहे. औरंगाबादचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन हा सरकारला इशारा दिला आहे.

“व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात. बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे धमकी देतायतं का ? भाजप नेत्याचा सवाल !

News Desk

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

News Desk