HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे धमकी देतायतं का ? भाजप नेत्याचा सवाल !

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत य याच्या आत्महत्येला राजकीय वळण देण्यात आले. यावरून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. यावर आदित्य ठाकरे यांनी एक पत्र लिहिले होते. त्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘’मी आजही संयम ठेऊन आहे’ या विधानाचा अर्थ काय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. राज्य मंत्रीमंडळातील सदस्याने ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे ते धमकी देत आहेत का? असा अर्थ लोकांनी घ्यायचा का? असाही प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यमंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकार्या वर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण ?” असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

“मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत असे पत्रकात म्हटले आहे, परंतु ५० दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला मान. मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत, परंतु या प्रकरणात पोलिस सखोल तपास करत आहेत”,असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले नवजात बाळाचे पालकत्व

swarit

Bhima Koregaon : भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास 

News Desk

‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?’, अंधेरीच्या पोलीस कुटुंबीयांचा सरकारला सवाल

Chetan Kirdat