HW News Marathi
महाराष्ट्र

सामना वृत्तपत्र कधी वाचलेच नाही आणि आमच्या जिल्ह्यात पेपर येतही नाही – गोपिचंद पडळकर

सिंधुदुर्ग | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर कायमच टीका केली जाते. आजच्या (२२ फेब्रुवारी) सामनाच्या अग्रलेखातून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव यावरुन केंद्र सरकारवर टोला लगावण्यात आला होता. यावरुन आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर पलटवार करत टीका केली आहे. “सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही”, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशी टिप्पणी पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज (२२ फेब्रुवारी) सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही, असे सांगितले आहे. “सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो?, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणं बरोबर नाही”, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

काय लिहिले होते सामनाच्या अग्रलेखात?

पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर केली आहे. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावं लागेल. मग बसा बोंबलत, असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर केली आहे.लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावं लागेल. मग बसा बोंबलत, असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये पूल कोसळण्याची दुर्घटना,१३ जण जखमी असल्याची माहिती !

News Desk

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

शिवसेनेची मोठी घोषणा, नाशिक मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

News Desk