HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर लॉकडाऊनचे संकट, मुख्यमंत्र्यांनी दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. काल (२१ फेब्रुवारी) रात्री समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी होईल अशा सर्व धार्मिक, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, यात्रांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच, पुढील आठवडाभर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, पाळली जाणारी शिस्त याचा आढावा घेऊन राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लावायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट दरवाजावर धडका मारत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरसारख्या उपायांचे काटेकोर पालन करणे आवश्यक बनले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध परवानग्या दिल्या. मात्र, त्यामुळे सर्वत्र गाफिलपणा आला आहे. अशाच मानसिकतेमुळे पाश्चिमात्य देशांवर दुसऱ्यांदा कठोर लाॅकडाऊन लादण्याची वेळ आली असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेनंतर आता होय, मीच जबाबदार, या मोहिमेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा, नियम पाळा आणि कोरोना टाळा. अन्यथा पुढील आठ दिवसांत आढवा घेऊन लाॅकडाऊन लावावा लागेल.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांसह विरोधक आणि सहकारी पक्षांचेही आजच्या संबोधनात एक प्रकारे कान टोचले. अलीकडे कोविड योद्धयांचा सत्कार सुरू झाला आहे. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे का बंद, ते का सुरू नाही, अशा भूमिका घेणाऱ्यांनी केलेले कार्यक्रम थोतांड आहेत. आपण कोविड योद्धे बनू शकलो नाही तरी किमान कोविड दूत तरी बनू नकात, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपालांच्या उपस्थितीत कोविड योद्धयांच्या सत्काराचे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. त्याकडे हा अंगुली निर्देश मानला जात आहे. तर, लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत, म्हणत भाजपला सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय?”, हायकोर्टाने केला सवाल

News Desk

महाराष्ट्र 2019 पर्यंत दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्की आवडले असते !

News Desk