HW News Marathi
महाराष्ट्र

संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

मुंबई | महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचिती आली असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे मांडले आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्बंध घालताना शासनाने पहिला विचार गोरगरीबांचा केल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जात आहे. प्रशासन अहोरात्र काम करत असून आज आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे असे आवाहनही जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा. आपण कोरोनाची ही साखळी तोडू असा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे – नवनीत राणा 

News Desk

राज्यातील आणखी एक मंत्री सेल्फ क्वारंटाईन! खबरदारी म्हणून घेतला निर्णय

News Desk

राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात, मात्र प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होणार?

News Desk