HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांचं FB live म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही”

मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१३ एप्रिल) रात्री राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली. दरम्यान, ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहेे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते?’’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत अपुरी असल्याचे सांगत अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे कित्येक लोक मदतीपासून वंचित राहणार. यांचा विचार कोणी करायचा. मुळात ज्यांना मदत दिली तीही अपुरी, इतरांना तर साफ वाऱ्यावर सोडलंय. त्यांना मदत का मिळाली नाही ? की मनात येईल ते बोलायचं आणि मनाला वाटेल ते करायचं सगळाच सावळा गोंधळ सुरू आहे, असेही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

Aprna

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Manasi Devkar

पटोले-थोरातांना फडणवीसांवर विश्वास, म्हणाले….!

News Desk