HW News Marathi
Covid-19

राज्यात उद्यापासून १५ दिवस काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून म्हणजेच १४ एप्रिलपासून १५ दिवस १४४ कलम लागू करण्यात आले असून, संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येण-जाणं पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू देणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्यापासून काय सुरु आणि काय बंद असणार जाणून घ्या…

काय सुरु राहणार?

– रेल्वे लोकल बस सुरु

– सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

– अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

– मेडिकल, किराणा दुकाने सुरु राहणार

– खत दुकाने, शीतगृहे, शेती कामे सुरु राहणार

– औद्योगिक क्षेत्रातले उद्योगधंदे सुरु राहणार

– जेवणाची पार्सल सेवा सुरु राहणार

– पेट्रोल पंप सुरु राहणार

– अत्यावश्यक सेवेशी निगडीत उद्योग सुरु राहणार

– शिवभोजन थाळी मोफत मिळणार

– फक्त अत्यावश्यक गोष्टींचीच ऑनलाईन खरेदी सुरु राहणार

काय बंद राहणार?

– हॉटेल, रेस्टोरंट, बार बंद राहणार

– शाळा, महाविद्यालय बंद राहणार

– खासगी क्लासेस पुर्णपणे बंद राहणार

– धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी

– चित्रपटगृहांसह शुटींगवर बंदी

– स्पा, सलून बंद राहणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ‘आप’च्या मागणीला भाजपचे समर्थन

News Desk

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

swarit

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी,भाजीविक्रेत्याच्या मृत्यु ..

Arati More