HW News Marathi
महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात संचारबंदी, पंढरपूरला मात्र वगळले! निवडणूकीसाठी सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेत राज्यात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक याला अपवाद ठरली आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ही निवडणूक झाल्यानंतर पंढरपूरातही सर्व निर्बंध लागू होतील असे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात उद्यापासून संचारबदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे १७ एप्रिलला पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक या निर्बंधातून तात्पुरती वगळण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक पार पडल्यानंतर जे निर्बंध लागू केले आहेत ते तिथेही लागू होतील. त्यामुळे एकीकडे रुग्ण वाढ होत असली, मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक, राजकीय सभा आयोजित न करण्यास सांगितले असूनही ही निवडणूक मात्र अपवाद ठरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MIMने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं! – अतुल लोंढे

Manasi Devkar

पुनर्विकासासाठी  म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील! –  जितेंद्र आव्हाड

Aprna

महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 नुसार स्थापित एसईझेड

News Desk