HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५८ हजारांच्या पार

मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वारंवार मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (९ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली. तर याच एका दिवसात आज नवीन ४५ हजार ३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आज जारी झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण २६ लाख ९५ हजार १४८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.९६% झाले आहे.

आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहोत !

राज्यातील लॉकडाऊनबाबत बोलताना राजेश टोपे म्हणतात की, “जर राज्यातील कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल. आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पण तो करावा लागू नये अशीच अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण कोरोनास्थितीवर नियंत्रण मिळवले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. मात्र, स्थिती तशीच राहिली तर आपली वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होईल”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. NDTVशी बोलताना राजेश टोपेंनी हे मोठे विधान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पहिली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू; धनंजय मुंडेंचा निर्णय

Aprna

येत्या २ वर्षांत कोरोनाचा संपूर्ण नायनाट होईल | WHO

News Desk