HW News Marathi
महाराष्ट्र

अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आणखी निधीची आवश्यकता, योगदानासाठी पुढे यावे !

नाशिक । ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाच्यावतीने जवळपास २ कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधीन विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक झाली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ६१ वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी हि अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येवून लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी बैठकित सांगितले.

संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना

साहित्य संमेलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सर्व मराठी साहित्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलेनास देशातून व राज्यातून अनेक साहित्यिक, लेखक, कवी व रसिक मंडळी हजेरी लावणार आहेत. नाशिक शहराला साहित्य परंपरेबरोबरच परंतु जिल्ह्यांत आता अनेक धार्मिक पर्यटन स्थळही विकसित झाली आहेत.संमेलनासाठी येणारा प्रत्येक माणूस नाशिक मध्ये आल्यानंतर पर्यटन करुनच जाणार आहे. त्यामुळे उद्योगधंदा पर्यटन वाढणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….म्हणून राज्यपाल गोव्याला गेले, राजभवनाकडून स्पष्टीकरण

News Desk

सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं

News Desk

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk