HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

मुंबई | नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी एबीपी माझाशी बोलताना नाना पटोले यांनी यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

“नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे

“मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. “काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,” असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, परीक्षेच्या तारखेत झाला बदल

News Desk

शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार १ लाख सौर कृषी पंप योजना

Gauri Tilekar

कमला मिलमधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या १४ मुंबईकरांना न्याय द्या, शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

News Desk