HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी !  गुलाबराव पाटलांची बोचरी टीका

मुंबई | “नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. राणेंना काहीही कामधंदा उरलेला नाही”, असे म्हणत मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘नाणार’च्या मुद्द्यावरून नुकतीच राणेंनी शिवसेनेवर टीका केली होती. “पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे”, असे राणे म्हणाले होते. दरम्यान, राणेंच्या याच टीकेला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“नारायण राणेंना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. ते आधी काहीतरी बोलतात, नंतर काहीतरी वेगळे बोलतात. बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे त्यांचा तोच प्रयत्न असतो. ते स्वतः जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोकणासाठी असे किती प्रकल्प आणले ?”, असे बोचरा सवालही यावेळी गुलाबराव पाटलांनी विचारला.

“शिवसेनेने नारायण राणेंना खूप काही दिले. शिवसेनेत असताना ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोकणासाठी असे किती प्रकल्प आणले ? तेव्हाही राणेंनी कोकणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे, कोकणासाठी कुणी काय केले ? यावर राणेंनी काहीच बोलू नये. ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठीच अशी वक्तव्य करत राहतात”, असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते ?

“पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. नाणारमधील काही लोकांनी २ दिवसांपूर्वी नाणार प्रकल्पाला समर्थन दिले. त्यात तब्बल ८० टक्के शिवसैनिक होते. शिवसेनेकडून पूर्वी या प्रकल्पाला विरोध झाला आणि आता समर्थन दिले जात आहे. हा शिवसेनेचा घुमजाव आहे. ते बोलण्यात कधी काय बदल करतील हे सांगू शकत नाही”, अशी टीका नारायण राणेंनी केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?”, हायकोर्टाचा राऊतांना सवाल

News Desk

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk

“योग्य वेळी ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू”, फडणवीसांचा इशारा

News Desk