HW News Marathi
देश / विदेश

छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींकडून संताप व्यक्त 

मुंबई | बेळगावामधील एका गावातून एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्यात आल्याची घटना घडली आहे. मनगुत्ती गावामध्ये एक रात्रीत हा प्रकार घडल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारच्याच आदेशानुसार एका रात्रीत संपूर्ण पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा हा पुतळा हटविण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने हटविला गेल्याने राज्यातील शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामपंचायतीच्या ठरावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, सुरुवातीपासून हा पुतळा हटवण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात होता. याविरोधात मनगुत्ती गावातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांच्या रोष पाहून पोलिसांनी दबाव कमी केला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कायम ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर आता कर्नाटक सरकारनेच हा पुतळा हटविल्याचे माहिती समोर येत आहे.

कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने एका रात्रीत शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा हटवला. मनगुत्ती गावातीलच दुसऱ्या गटातील नागरिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान, या प्रकारामुळे एक प्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर, सोमवारपर्यंत शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील शिवभक्तांनी दिला आहे.

“कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा तातडीने पुन्हा उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील”, अशा इशारा देखील कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावातील गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताची कारवाई पाकिस्तानच्या जिव्हारी, संसदेत दिले ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे

News Desk

स्वातंत्र्य दिनी हजर रहा, सरकारी बाबूंना आदेश

News Desk

मध्य प्रदेशमधील ‘सस्पेन्स’ कायम आहे इतकेच म्हणता येईल !

swarit