HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीचा रिमोट माझ्या हातात नाहीच, पण…! अखेर शरद पवारांची कबुली

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर येत होते. मात्र, तसं काही नसल्याचे देखील त्याच सरकारच्या काही नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, आघाडीतील या नाराजीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहेत’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.न्यूज18 लोकमताला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत असताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

‘गाडीचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसंच महाविकास आघाडीबद्दल भाष्यही केले. ‘सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार ५ वर्ष चालणार आहे. पण भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना सरकार पाडण्याची घाई आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक कोणालाही नको आहे’ असे म्हणत पवारांना फडणवीसांना टोला लगावला आहे.

तसेच, मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे कौतुक देखील केले. “निर्णय मुख्यमंत्री घेत आहे. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे’ असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असता अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.’उद्धव ठाकरे यांच्या सरकारला चिंता नाही. ते सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे”, असेही ते म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली होती. या परिस्थितीत आम्ही सर्व चाचपडून पाहिलं आणि याचे नेतृत्व शिवसेनेकडे जावं यासाठी एकमत झाले होते”, असेही पवारांनी सांगितले.

”आज काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आता तीन पक्षांचे आघाडी सरकार आले तर कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये अशी नाराजी आणि अस्वस्था असणारच आहे. राज्य चालवताना काही इच्छा असतात, त्या आघाडी सरकारमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात असे नाही म्हणून काही जण अस्वस्थ असतात” असे सांगत पवारांनी काही मंत्री अस्वस्थ असल्याची कबुली दिली आहे.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, “भाजपला लोकशाही विचार पचत नाही, असं दिसतं आहे. म्हणून आपल्या विचारापेक्षा दुसरं सरकार नकोच हे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जावस वाटत, पण त्यांचे सहकारी त्यांना असं करू देत नाही”, अशी टीकाही पवारांनी अमित शहा यांचे नाव न घेता केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा, नाहीतर कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे!

News Desk

कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk