HW News Marathi
महाराष्ट्र

“मी कधीही मातोक्षीवर फोन केला नाही”, नारायण राणेंचे विनायक राऊतांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

सिंधुदुर्ग | वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा भाजप नेते नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. नारायण राणे यांनी आज (११ जानेवारी) सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला. “नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली,” असा दावा राऊत यांनी केला. “उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा,” असा राजकीय सल्ला राऊत यांनी नारायण राणे यांना दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जी मुंबईत पोहोचताच ​​​​​​​घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन!

News Desk

राज्यपालांना शिफारस केल्यानंतर; आज विधानभा अध्यक्षाची निवड होणार का?

Aprna

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथचे कौतुक

Aprna